सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१
'ट्री मॅन ऑफ इंडिया'
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१
कोल्हापूरची रणरागिणी
![]() |
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१
भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय
.
३१ ऑगस्ट रोजी, भटके विमुक्त दिवस साजरा झाला. त्यानिमित्त एक आठवण जागी झाली. टाळेबंदीची दुसऱ्या लाट येण्यापूर्वी भटके विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी आम्ही काही समविचारी मंडळी एकत्रित आलो होतो. यानिमित्त भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्याचा विचार सुरू होता. पण टाळेबंदीमुळे ती घेता आली नाही. ' भटके विमुक्त: सद्यस्थिती आणि उपाय' या विषयावर मी पेपर लिहिला होता. तो इथे शेयर करत आहे.
आज भारताला स्वातंत्र मिळून तब्बल ७५ वर्षे झाले तरी, भटक्या विमुक्त जमाती विकासाच्या
प्रक्रियेपासून शेकडो मैल दूरच राहिल्या आहेत. महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या
४९ जाती आणि त्यांच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती आहेत. यांना ना हक्काची जमीन
आहे ना घर, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या
लोकांच्या जगण्याची परवड अजूनही थांबलेली नाही. भटक्या विमुक्तांच्या काही
जमातींवर बसलेला गुन्हेगारीचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. याच धरत्रीचे
पुत्र असूनही नागरिकत्वाची ठळक ओळख त्यांच्यापाशी नाही. राजकीय उपेक्षा, पोलिसांचा
जाच, याबरोबरच जात पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत सापडलेल्या
या समाजाच्या दैन्यावस्था अजूनही संपल्या नाहीत. या समाजातील स्त्रियांचे दु:ख ही
भेदक आहेत.
विमुक्त जातीं (व्हिजे)
महाराष्ट्रात विमुक्त जातींची (व्हिजे) संख्या
१४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे. बेरड, बेस्तर, भामटा, कैकडी, कंजारभाट, कटाबू, बंजारा, राज पारधी, राजपूत
भामटा, रामोशी, वडार, वाघरी, छप्परबंद
(मुस्लिम धर्मीयासह) जातीचा समावेश होतो.
भटक्या जमातीं (ब)
भटक्या जमातींची (ब) (एनटी-बी) संख्या ३८ असून
या प्रवर्गास २.५% आरक्षण आहे. यात गोसावी, बेलदार, बेलदार
,भुते, भराडी, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदीवाले, पांगूळ, रावळ, सिक्कलगर, वैदू, वासुदेव
,भोई, बहुरुपी, ठेलारी, ओतारी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले, गिहारा/गहरा, गुसाई/गोसाई, मुस्लिम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर, भारतीय
इराणी, गवळी, मुस्लिम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल,दरवेशी, वाघवाले-
शाह (मुस्लिम धर्मीय), अस्वलवाले, बागडी या जमातींचा सामवेश होतो.
भटक्या जमाती (क) (एनटी-सी)
भटक्या जमातींची (क) (एनटी-सी) मध्ये धनगर या
एकाच भटक्या जमातींची समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे. अहिर, धनगर अहिर,डांगे,गढरी, हंडे, तेलवर,
हटकर, हाटकर, शेगर, सगर, सेगर, खुटेकर, तेलंगी, ठेलारी,
कोकणी-धनगर,कानडे, वऱ्हाडे, धनगर, झाडे, झेंडे, कुरमार, माहुरे, लाडसे, सनगर, धनवर,
गडारिया, गड्री, गढरी, डंगेधनगर व डोंगरी धनगर, गडरिया/ गडारिया या जमातींचा समाविष्ट
होतो.
भटक्या जमातींची (ड)
भटक्या जमातींची (ड) (एनटी-डी) संख्या १ (वंजारी) असून या प्रवर्गास २ % आरक्षण आहे
आज डोंबारी , बहुरूपी , कलंदर , वैदू मरीआईवाले , नाथपंथी , नंदीवाले , बेलदार , कोल्हाटी , रामोशी , पाथरवट , उचले यांच्या आयुष्याची तर फारच दैना झालेली आहे. या शिवाय राज्यातला इतर भटका बांधव अनेक शासकीय लाभापासून वंचित आहे. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात अजूनही बदल झाला नाही. आजही ते लाजलेले व बुजलेले वाटतात. भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी १४ मार्च २००५ ला केंद्र सरकारने बाळकृष्ण रेणके आयोगाची स्थापना केली होती. आयोगाच्या अहवालानुसार आजही या जमातीतील ९८ टक्के लोकांकडे रेशनकार्ड नाही, ७२ टक्के लोक भूमिहीन आहेत आणि ९८ टक्के लोकांना कोणत्याही प्रकारचे बँकेचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. या प्रवर्गातील लोक हे देशातील सर्वात दुर्बल घटक आहेत. अहवालानुसार विकास मात्र अजूनही झाला नाही. १९ फेब्रुवारी २०१४ च्या केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली एका नवीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. इदाते यांच्याकडून वंचित घटकांचा विकास होईल, अशी अपेक्षा करूया.
या समूहाचे उत्थान करायचे असेल तर प्रथम अन्न, निवारा, शिक्षण आणि महिलांच्या प्रश्नांचा शोध घेऊन त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत.
रेशनकार्ड व आधारकार्ड
उपाय
२)भटक्या समाजापर्यंत रेशनकार्ड व आधारकार्ड
पोहोचण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि रेशन दुकानदार आशा तीन जणांची टीम तयार करुन
भटक्या समाजातील लोकांना रेशनकार्ड व आधारकार्ड
उपलब्ध करून देणे.
भटक्या समाजातील महिला व पुरुषांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते. तसेच पुरुषसत्ताक जातपंचायतीमध्ये या महिलांना दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यासाठी महिलांना योग्य सन्मान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
१)भटक्या विमुक्त जमातीतील महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांना अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्याचे विशेष संरक्षण द्यावे आणि भटके विमुक्त जमातींना जातीचा दाखला काढण्यासाठी १९६१ सालच्या वास्तव्याच्या पुराव्याची अट रद्द करणे.
२) एस.एसटी प्रमाणे अत्याचार प्रतिबंधक कायदा भ.वि.जा.ज यांना देखील संरक्षण देणे.
३)भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी अॅक्टचे
संरक्षण मिळाले पाहिजे.
भटक्या समाजातील धनगर घटकांचा आरक्षणाचा विषय नेहमी चर्चेत असतो. या समूहाला कायदेशीर मार्गाने सवलत मिळणे आवश्यक आहे.
उपाय
जात-जमात कोणत्या वर्गात समाविष्ट आहे हे
दर्शविणारी तीन परिशिष्टे घटनेत जोडली आहेत. यातील परिशिष्ट नंबर दोन (अनुसूचित
जमातीची यादी)मध्ये छत्तीस क्रमांकावर ओरान आणि धनगड या जातींचा उल्लेख आहे. यातील
धनगड म्हणजेच धनगर होय. भारताची घटना इंग्रजी व हिंदीत लिहिली आहे. भाषा
शास्त्रानुसार जसे ताकारी यांचे ताकाडी, जाखरचे जाखड, गुरगावचे गुडगाव
होते तसेच धनगरचे धनगड झालेले आहे.
१) ‘र’ आणि ‘ड’चे खुसपट काढून धनगरांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे.
२) मेंढपाळाना संरक्षण देणे व गायरान - वनक्षेत्रातील जमीन मेंढपाळांना उपलब्ध करून देणे.
३) धनगर समाजासाठी १० हजार घरे, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती अशी एक हजार कोटी रूपयांची योजना भाजपा सरकारने जाहीर केली होती त्यावर काम देखील सुरू होते मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वरील सर्व योजना बंद केल्या. या सर्व योजना -सवलती तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे.
कैकाडी व ठकारी जातीसाठी
उपाय
२)विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी
समाजात रोटी बेटीचे व्यवहार होतात, त्यामुळे हे दोन्ही समाज एकच आहेत. राज्यातील
कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवणे आवश्यक.
या शिवाय शासनाने वंचित समाजाच्या विविध परंपरांची माहिती संकलित करणे गरजेचे आहे, त्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मुख्य म्हणजे या समूहाच्या प्रश्नांकडे बघण्याची सरकारची व समाजाची दृष्टी न्यायसुसंगत असली पाहिजे.
छायाचित्र -आंतरजालावरून
विकास पांढरे,९९७०४५२७६७
कुशल व्यवस्थापक
असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
साहेबराव :- हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय... सरकार : ......









