शुक्रवार, ३० जून, २०१७
काळी आई : काही प्रश्न
आज कृषी दिन म्हणजे आमचा दिवस. शेतकरी पुत्र म्हणून काळ्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्यच आहे आणि ती असायलाच पाहिजे. आज शेतीबाबतच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागल्या आहेत. शेती आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. सध्या गावाकडे खरीप पेरणी उरकली आहे पण काही दुर्मिळ बी-बियाणे नष्ट होत असल्याचे चित्र आहे.
.......................................
उथळ व कुसळी गवताचा तालुका म्हणजे तुळजापूर. बोरी नदीमुळे काही भाग ओलिताखाली आला असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे काही प्रमाणात प्यायला पाणी मिळणे मुश्कील. भौगोलिक स्थिती, हवामान स्थितीचा विचार केला असता या भागात तूर,सोयाबीन, उडीद ही खरीप तर ज्वारी हे रब्बीचे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील शेती ही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. तंत्रज्ञान आणि रसायनिक खतांमुळे कुसळे नष्ट झाली ही चांगली बाब.
............................
शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं आहे. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात गार गार वार्याची, मातीला सुगंध देणार्या पहिल्या सरीची.. मी बघतो तसा आमची शेती पूर्णपणे शेतीवरच अवलंबून. पावसाळा सुरू झाला की खरीप पेरणीची लगबग असायची. या काळात सर्व जण पेरणीत अडकल्याने माझ्यावर शाळेला दांडी मारून जनावरांची राखण्याची वेळ यायची. पावसाळी दिवस.. धरत्रीचा हिरवा शालू..ससे,घोरपड, मोर,काळवीट, हरीण हे वन्यजीव बाहेर पडायचे.. त्यात जनावरांच्या गळ्यातील घंटीचा आवाज... आंब्याच्या झाडांवर खेळलेला सूर पारंबा... ओढ्याला आलेले मासे..ते पकडून केलेली पार्टी.. तळ्यात मनसोक्त पोहण्यातला आनंद औरच होता... राही जांभळ खाण्यासाठी शाळेला मारलेली दांडी.. मास्तराचा मार..
......................................
आमच्या शेताची खास बात म्हणजे साळी. साळीचं तीन पोते बी पेरणीसाठी लागयाचे. त्यासाठी आमच्या वडिलांची व काकांची महिनाभर राब चालयची. साळी म्हणजे तांदूळ. आमचं हे मुख्य पीक असल्याने सगळीजणे लक्ष द्यायचे. गावातही ८० टक्के शेतकरी साळी पेरायचे. आमच्या कुटुंबासह साळी, राळं ( भगरी सारखा पदार्थ) हुलगा, आंबडी, लहान कारळं, मठकी, जवस, तूर, तीळ आदी देशी बियाणाची पेर व्हायची.. देशी साळीचा भात आणि दुधाची चवच न्यारी होती. सकाळ व दुपार यावरच ताव मारायची. सोबत जवसाची चटणी, आंबड्याची भाजी असायची...
....................................
गेल्या दहा बारा वर्षापासून साळीचे क्षेत्र आमच्यासह गावातील सर्व शेतकऱ्यांनी शून्यावर आणले आहे. हुलगा, जवस,लहान कारळं,आंबडी,राळं, बाजरी, मूग, हायब्रीड (महाबीज) तीळ ही धान्ये नामशेष झाली आहेत. लहानपणी ही सर्व पीके शेतात दिसायची. हुलगा तर केव्हाच बुडाला.... महाबीजची पिशवी म्हणजे आमचं शाळेचं दप्तर असायचं. पिशवी साठी आमच्या भावडाचं भांडण लागयचं. शालेय शिक्षण संपेपर्यंत महाबीजची पिशवी प्रिय असायची...
......................................
पारंपरिक शेतीत मिश्र पिके घेतली जात. पाऊसपाण्याने दगा दिला, हवामान बदलले तरी त्याचा फटका सगळ्या पिकांना बसत नसे. मिश्र पिकांमधील काही पिके त्यातही तग धरत असतं. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत नसतं.
...….......................
आंबडी,मटकी, कारळाची जागा सोयाबीन व उडदाने घेतली आहे. आज शेती क्षेत्रात बदल होत आहेत.योग्य पिकांची निवड आणि सिंचनाच्या काटेकोर पद्धतीवर लक्ष द्यावे लागत आहे.गेल्या अर्धदशकात स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचा तत्कालिक लाभ झाला. म्हणजे काही काळ कृषी उत्पादन वाढत गेले परंतु त्या पातळीवर ते दीर्घ काळ टिकून राहिले नाही. पारंपरिक बि-बियाणांची जाती-प्रजाती आपण नष्ट करून बसलो आहोत. यापुढे शेतीमध्ये शाश्वततेचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक आहेच शिवाय देशी बि-बियाणे टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
..............................
पत्रकारितेत आलो तेव्हा शेती विषयाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. सरकार कुणाचेही असो शेतीच्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या ज्वारी,डाळिंब व मराठवाड्यातील केशर आंब्याला केंद्र शासनाचे जीआय मानांकन मिळाले. तेव्हा या तीन्ही बातम्या दिलेल्या महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असल्याचा मला अभिमान वाटतो.भविष्यात ही सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
( टीप : वरील उपस्थित झालेले प्रश्न माझे वैयक्तिक व गावापुरते मर्यादित आहेत.)
©विकास पांढरे, सा.विवेक, मुंबई
९९७०४५२७६७
.......................................
उथळ व कुसळी गवताचा तालुका म्हणजे तुळजापूर. बोरी नदीमुळे काही भाग ओलिताखाली आला असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे काही प्रमाणात प्यायला पाणी मिळणे मुश्कील. भौगोलिक स्थिती, हवामान स्थितीचा विचार केला असता या भागात तूर,सोयाबीन, उडीद ही खरीप तर ज्वारी हे रब्बीचे मुख्य पीक घेतले जाते. या भागातील शेती ही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. तंत्रज्ञान आणि रसायनिक खतांमुळे कुसळे नष्ट झाली ही चांगली बाब.
............................
शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं आहे. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात गार गार वार्याची, मातीला सुगंध देणार्या पहिल्या सरीची.. मी बघतो तसा आमची शेती पूर्णपणे शेतीवरच अवलंबून. पावसाळा सुरू झाला की खरीप पेरणीची लगबग असायची. या काळात सर्व जण पेरणीत अडकल्याने माझ्यावर शाळेला दांडी मारून जनावरांची राखण्याची वेळ यायची. पावसाळी दिवस.. धरत्रीचा हिरवा शालू..ससे,घोरपड, मोर,काळवीट, हरीण हे वन्यजीव बाहेर पडायचे.. त्यात जनावरांच्या गळ्यातील घंटीचा आवाज... आंब्याच्या झाडांवर खेळलेला सूर पारंबा... ओढ्याला आलेले मासे..ते पकडून केलेली पार्टी.. तळ्यात मनसोक्त पोहण्यातला आनंद औरच होता... राही जांभळ खाण्यासाठी शाळेला मारलेली दांडी.. मास्तराचा मार..
......................................
आमच्या शेताची खास बात म्हणजे साळी. साळीचं तीन पोते बी पेरणीसाठी लागयाचे. त्यासाठी आमच्या वडिलांची व काकांची महिनाभर राब चालयची. साळी म्हणजे तांदूळ. आमचं हे मुख्य पीक असल्याने सगळीजणे लक्ष द्यायचे. गावातही ८० टक्के शेतकरी साळी पेरायचे. आमच्या कुटुंबासह साळी, राळं ( भगरी सारखा पदार्थ) हुलगा, आंबडी, लहान कारळं, मठकी, जवस, तूर, तीळ आदी देशी बियाणाची पेर व्हायची.. देशी साळीचा भात आणि दुधाची चवच न्यारी होती. सकाळ व दुपार यावरच ताव मारायची. सोबत जवसाची चटणी, आंबड्याची भाजी असायची...
....................................
गेल्या दहा बारा वर्षापासून साळीचे क्षेत्र आमच्यासह गावातील सर्व शेतकऱ्यांनी शून्यावर आणले आहे. हुलगा, जवस,लहान कारळं,आंबडी,राळं, बाजरी, मूग, हायब्रीड (महाबीज) तीळ ही धान्ये नामशेष झाली आहेत. लहानपणी ही सर्व पीके शेतात दिसायची. हुलगा तर केव्हाच बुडाला.... महाबीजची पिशवी म्हणजे आमचं शाळेचं दप्तर असायचं. पिशवी साठी आमच्या भावडाचं भांडण लागयचं. शालेय शिक्षण संपेपर्यंत महाबीजची पिशवी प्रिय असायची...
......................................
पारंपरिक शेतीत मिश्र पिके घेतली जात. पाऊसपाण्याने दगा दिला, हवामान बदलले तरी त्याचा फटका सगळ्या पिकांना बसत नसे. मिश्र पिकांमधील काही पिके त्यातही तग धरत असतं. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत नसतं.
...….......................
आंबडी,मटकी, कारळाची जागा सोयाबीन व उडदाने घेतली आहे. आज शेती क्षेत्रात बदल होत आहेत.योग्य पिकांची निवड आणि सिंचनाच्या काटेकोर पद्धतीवर लक्ष द्यावे लागत आहे.गेल्या अर्धदशकात स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचा तत्कालिक लाभ झाला. म्हणजे काही काळ कृषी उत्पादन वाढत गेले परंतु त्या पातळीवर ते दीर्घ काळ टिकून राहिले नाही. पारंपरिक बि-बियाणांची जाती-प्रजाती आपण नष्ट करून बसलो आहोत. यापुढे शेतीमध्ये शाश्वततेचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक आहेच शिवाय देशी बि-बियाणे टिकवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
..............................
पत्रकारितेत आलो तेव्हा शेती विषयाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. सरकार कुणाचेही असो शेतीच्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या ज्वारी,डाळिंब व मराठवाड्यातील केशर आंब्याला केंद्र शासनाचे जीआय मानांकन मिळाले. तेव्हा या तीन्ही बातम्या दिलेल्या महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असल्याचा मला अभिमान वाटतो.भविष्यात ही सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
( टीप : वरील उपस्थित झालेले प्रश्न माझे वैयक्तिक व गावापुरते मर्यादित आहेत.)
©विकास पांढरे, सा.विवेक, मुंबई
९९७०४५२७६७
सोमवार, २६ जून, २०१७
माणदेशी शेतकरी कन्या
सध्या पावसाळी दिवस असल्याने जिकडे तिकडे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे बळीराजा शेतीची मशागत करून काळया आईची ओटी भरताना दिसतोय. अशातच सध्या एक छायाचित्र सामाजिक माध्यमातून सर्वत्र व्हायरल झालंय. हे चित्र पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटतं, शिवाय एक शिकलेली पोरगी चक्क दोन बैलांचं औत ओढताना पाहून ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही, इतके जिवंत चित्र आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेल्या माण तालुक्यातील गटेवाडी इथे बारावीत शिकत असलेल्या मनीषा खरात हिची ही कहाणी..
माणदेश म्हटलं की डोळयासमोर येतो तो दुष्काळ, दूरदूरपर्यंत ना झाडं दिसतं, ना सावली, ना पाणी, ना बागायती शेती.. दिसतं फक्त कुसळी गवत, शुष्क माळरान अन माळरानावर चरणाऱ्या मेंढया. थोर ग्रामीण साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी 'माणदेशी माणसं' या आपल्या कथासंग्रहातून माणदेशी माणसांचं आणि प्रदेशाचं रसभरित वर्णन केलं आहे. त्याचबरोबर माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या कादंबरीची नायिका शकू जशी आपल्या मेंढया सांभाळून शेती करते, अगदीअशाच प्रकारचं वास्तववादी चित्र माण तालुक्यातील गटेवाडी इथल्या मनीषा खरात हिच्या बाबतीत घडलंय. साधारण चौदाशे लोकवस्तीचं गाव.. गावात पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेतीवर अवलंबून राहता येत नाही, शिकून मोठं व्हावं असं ठरवलं तर शिक्षण घेता येत नाही.. अशीच परवड मनीषा खरात हिच्या वाटयाला आलीय. मेंढीपालन हाच मनीषाच्या कुटुंबाचा व्यवसाय. गावात वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. शेतात विहीर आहे, पण पाणी नाही. पावसाळयात विहिरीला पाणी असतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे खरात कुटुंबीयांना शेळया-मेंढयांवर गुजराण करावी लागते. काळ बदलला असला तरी खरात कुटुंबीयांचं मेंढयावरचं जिणं मात्र काही थांबलं नाही. आपल्या पोराबाळांना चांगलं शिकवावं अशी त्यांची मनीषा आहे. त्यासाठी ते जिवाचं रानं करताहेत..
ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता या गावाहून त्या गावाला सतत स्थलांतर करणाऱ्या खरात कुटुंबाने आपल्या पिलांना गावात जरी ठेवलं असलं, तरी त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करणारी ऊर्जा दिलीय. अशा या वातावरणात चुणचुणीत दिसणारी मनीषा आपल्या लहान भावंडांसह आजी-आजोबांजवळ राहते. मनीषाला दोन बहिणी व एक लहान भाऊ आहे. मनीषा सगळयात मोठी. घरातील काम असो वा शेतातलं, ती मोठया मेहनतीने करते. शिक्षणातही ती कमी नाही. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिने 73 टक्के मिळवले आहेत. यंदा ती दहिवडी येथील कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. मेहनती, अभ्यासू व गुणवान विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये तिचा लौकिक आहे.
तिचे आई व वडील भीमराव खरात हे सध्या शेंळया-मेंढया घेऊन बाहेरगावी गेले आहेत. विशेषतः इथली माणसं मेहनती आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करणाऱ्या या मंडळींना घराकडे व आपल्या काळया आईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मनीषा खरातच्या घरातही हीच परिस्थिती आहे.
आई व वडील भीमराव हे अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहत आहेत. त्यामुळे शेतीची मशागत झाली नाही. यंदा वरुणराजाने लवकर हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी झाला असला, तरी वर्षानुवर्षं दुष्काळाच्या छायेत वावरत असलेल्या व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करत असलेल्या खरात कुटुंबातील मनीषासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं - आपली पेरणी कोण करणार? मशागतीला उशीर झाला, तर पेरणीला विलंब लागेल; अशातच आई-वडिलांना गावाकडे यायचं झालं, तर त्यांना खूप उशीर होईल... असे अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. अशा वेळी काळया आईची ओटी भरणं आवश्यक आहे, असं तिला मनोमन वाटू लागलं. क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या नातेवाइकांकडे गेली. आपल्या घरात कर्ता माणूस नसताना, शेताची मशागत करण्यासाठी तिने बैलजोडीची मागणी केली. मनीषावर असलेल्या नातेवाइकांच्या विश्वासामुळे त्यांनी बैलजोडी दिली. त्या मिळालेल्या बैलजोडीचं तिने सोनं केलं. मनीषाने स्वतः बैलजोडी व अवजारं घेऊन औत मारायला सुरुवात केली. जवळपास दोन ते तीन एकर शेत तिने मशागत करून आपली शेती पेरणीसाठी सज्ज केली. आजूबाजूचे लोक मनीषाच्या कर्तबगारीकडे पाहून तिची पाठ थोपटत होते. शिकलेली मुलगी औत मारत असल्याची चर्चा माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे मनीषा खरात हिची सामाजिक माध्यमांत चर्चा होत आहे. तिच्या जिद्दीची कहाणी नवतरुणांना चेतना देणारी आहे.
कुठून मिळते त्यांना ही ऊर्जा?
आज शेती क्षेत्रात विविध संकटं निर्माण झाली आहेत. त्यातच शेतकरी कर्जमाफीवरून असंतोषाचं वातावरण निर्माण झालं असताना माणसारख्या दुष्काळी भागात एक सुखद बातमी येते. आजच्या काळातील मुली शाळा आणि घर यामध्ये बंदिस्त असताना बारावीत शिकत असलेली हुशार मुलगी बैलजोडी घेऊन शेतीची मशागत करते, ही गोष्ट प्रेरणा देऊन जाते. खेडयातल्या या मुलीमध्ये इतकी संवेदनशीलता व ऊर्जा कुठून मिळते, हा एक संशोधनाचा भाग आहे. मनीषा खरातसारखी मुलगी भारतीय कृषी क्षेत्राला ऊर्जा देणारी आहे. तिच्या कर्तबगारीला सलाम तर केलाच पाहिजे, शिवाय कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी मनीषासारख्या मुलींना पाठबळ दिलं पाहिजे.
शेती क्षेत्रातील कर्तबगार महिला
चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली महिला आज विविध क्षेत्रांत झेप घेत आहे. पारंपरिक व्यवसाय असलेल्या कृषी क्षेत्रात महिला क्वचितच उतरत आहेत. मनीषा खरात ही त्यातीलच. त्यांची शेती जरी पारंपरिक असली, तरी पुरेशा पैशाअभावी त्या आधुनिक पध्दतीने शेती करू शकत नाहीत. आज महाराष्ट्रात शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कर्तबगार महिला आहेत.
मेहनत, कुटुंबातील सुसूत्रता, मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा ध्यास घेत नगर जिल्ह्यातील महिला शेतकरी मंगल शंिदे यांनी आपल्या 10 गुंठयातील शेतीत रोपवाटिका तयार करून त्या सुमारे साठ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल करतात.
चंद्रपूर जिल्ह्यात जागृत महिला समाज ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये सेंद्रिय शेती, पाणलोट क्षेत्रविकास, स्वावलंबन गट, सिंचनव्यवस्था, जीवविविधता आदी क्षेत्रांत प्रयोग करीत आहे. या भागात या शेतकरी महिलांनी जवळपास अकरा महसुली गावांतील शेतकरी महिलांमध्ये आत्मभान निर्माण केलं आहे. यामुळे हजारो महिला शेतकऱ्यांनी कुटुंबांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारून जमीन धारणा, सिंचनाची साधनं, खत, पशुधन, पीकपध्दती, शेतीवर होणारा खर्च व मिळणारं उत्पन्न, तसंच पूरक व्यवसाय या संदर्भात अभ्यास केला आहे. कणकवली तालुक्यातील भातडेवाडी येथील श्री कुर्ली देवी महिला बचत गटाने शासकीय योजनांचा लाभ घेऊन गटाच्या महिलांनी भात व नाचणी शेती केली आहे. बचत गटातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गावातील पडीक जमीन भाडयाने घेऊन शेतीत बदल घडवून आणला आहे.
शेतीत महिलांचा पुढाकार महत्त्वाचा
आपल्या देशात शेतीकामात महिलांचा 70 ते 80 टक्के सहभाग आहे. नांगरणी, ट्रॅक्टर, बैलजोडी, शेती विकणं, पाणी वळवणं, व्यवहार ही पुरुषांची कामं, तर महिलांची कामं म्हणजे निंदणी, वेचणी, काडी-कचरा, बी-बियाणं लावणं, चारापाणी करणं आणि घरातील कामं करणं. पण आज महिलांनी यात पुढे येणं गरजेचं आहे. आज शेतीतलं संकट हे शेतात काम करणारी महिला समजू शकते आणि तिच्या आवडीनिवडी, कौशल्यावर तिला शेती क्षेत्रातलं ज्ञान आणखी विकसित करता येईल. त्यामुळे महिला शेतकरी शाश्वत शेतीकडे नेणारी एक महत्त्वाची कडी आहे.
''शेतीच्या अर्थकारणाचा अभ्यास करणार!''
देशाच्या अर्थकारणात एकेकाळी शेतीचा पहिला नंबर लागत होता. देशात हरितक्रांती व श्वेतक्रांती झाली असली, तरी शेतीचा म्हणावा तितका विकास झाला नाही. शेतीची झालेली पीछेहाट काय हे मी समजून घेईन. काळानुरूप शेतीचा विकास करण्यावर माझा व माझ्या कुटुंबीयांचा भर असेल. एक मुलगी म्हणून शेती करण्यात कसलीही लाज वाटत नाही. सध्या मी बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत आहे. पुढे चांगले गुण मिळाल्यास पदवीसाठी शेती व अर्थकारणाचा अभ्यास करणार आहे. सध्या आपल्या राज्यात शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी सरकार वेगवेगळया धोरणांचा विचार करत आहे. सरकारने गरजू व गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.
- मनीषा खरात
माणदेशी शेतकरी कन्या
विकास पांढरे,९९७०४५२७६७
गुरुवार, २२ जून, २०१७
कर्जमाफीचे परिणाम आणि राजकीय फायदे
मराठवाडयापेक्षा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे प. महाराष्ट्रातला शेतकरी हाच या सरसकट कर्जमाफीचा जास्त हिस्सेदार असणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करण्यास विरोधकांना आणखी संधी मिळणार आहे. या कर्जमाफीमुळे सरकारवर 25 ते 30 हजार कोटीचा भार पडणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी व आपला विकास करण्यासाठी शाश्वत असा आधार शोधला पाहिजे, त्यासाठी कृषिक्षेत्रातील नवी संकल्पना, तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, तरच शेतकरी आणखी जगाला तारणारा ठरेल....
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चाधिकार मंत्रिगट आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना जलदगतीने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देण्याबरोबरच दोन दिवसांत दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेतला. यूपीएच्या काळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली होती. आतापर्यंत 5 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? त्यांच्या वेदनेपासून ते दु:खापर्यंत कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही, हे जाणकारांना माहीत आहे. शेतीचे अर्थकारण कोलमडून पडण्याची कारणे काय आहेत, याचा शोध पुरेशा गांभीर्याने आजवर घेतला गेलेला नाही. केवळ सिंचन प्रकल्पांचा नीट पाठपुरावा झाला असता, तरी महाराष्ट्राचे चित्र बदलले असते. शेतीचे प्रश्न हे पाण्याशी निगडित आहेत, तसेच ते उत्पादन, वितरण, हमीभाव याच्याशी संबंधितही आहेत. कर्जमाफीच्या उपाययोजना तात्पुरत्या मलमपट्टीसारख्या आहेत. कर्जमाफीबाबत फायदे, तोटे यांची चिकित्सा झाली पाहिजे.
राज्यात पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण, संभाजीनगर या कृषी विभागात 31 मार्च 2016 पर्यंत शंभर टक्के कृषी पतपुरवठा करण्यात आला. यामध्ये पुणे 30 टक्के, नाशिक 19 टक्के, संभाजीनगर 23 टक्के, नागपूर 11 टक्के, कोकण 5 टक्के पतपुरवठा करण्यात आला. यावरून पुणे आणि नाशिक विभागांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मुळात नाशिक व पुणे विभागातील सधन शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग वाढवली. सामान्य शेतकरी आंदोलनात सहभागी होता का? हा संशोधनाचा विषय आहे.
विदर्भ व मराठवाडयातल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा मिळणार नाही, हे आकडेवारीवरून सिध्द होते. 2008 साली झालेल्या कर्जमाफीप्रमाणे याही वेळी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. विदर्भ व मराठवाडयातील शेतकऱ्यांना सरासरी एकरी 14000 रुपयाचे पीक कर्ज बँका देतात. याउलट नाशिक, पुणे विभागातील बागायतदार शेतकऱ्यांना सरासरी 2.5 ते 3 लाख रुपये कर्ज बँकाकडून मिळते. विदर्भ व मराठवाडयापेक्षा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे. म्हणजे प. महाराष्ट्रातला शेतकरी हाच या सरसकट कर्जमाफीचा जास्त हिस्सेदार असणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करण्यास विरोधकांना आणखी संधी मिळणार आहे. या कर्जमाफीमुळे सरकारवर 25 ते 30 हजार कोटीचा भार पडणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जे एक लाख 34 हजार कोटी रुपयांच्या घरात असून ती माफ करणे कोणत्याही सरकारला शक्य नसते. फडणवीस सरकारने राज्यावरचा होणारा आर्थिक भार उचलत ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली आहेत. शेतकरी कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. या मलमपट्टीने जखम जरी बरी होत असली, तरी वेदना मात्र ठसठसत राहत असते.
कर्जमाफीचे होणारे परिणाम
1) कर्जमाफी हा सरकारी लाभ असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट लाभ द्यावा लागतो. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची स्थिती चांगली असेल, तरीसुध्दा त्याचे कर्ज माफ होते.
2) कर्ज न फेडण्याची घातक सवय लागते. सध्या अनेक शेतकरी बँकाकडून पीक कर्जाच्या नावाखाली लाखो रुपयांचे कर्ज घेतात, मात्र परतफेड करण्यासाठी त्यांचे मन धजावत नाही, अशी उदाहरणे प. महाराष्ट्रात पाहायला मिळतील. याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसतो. सरकार आपले कर्जमाफ करते तर मग पैसे कशाला भरायचे? अशीही काही शेतकऱ्यांची मानसिकता बनत चालली आहे. असे लोक स्वत: संकटात नसले तरी कर्जमाफीचा लाभ मात्र उचलत असतात.
3) कर्जमाफीचा तिसरा परिणाम म्हणजे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या समस्येवर कोणताही इलाज होत नाही. शेती आणि शेतकरी जगावयाचा असेल तर राजकीय आवेश बाजूला ठेवून दीर्घकालीन व परिणामकारक ठरेल असे धोरण निश्चित केले पाहिजे.
4) अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे सामान्य शेतकरी हतबल होतो. पीकपाणी चांगले नाही, तर आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो. त्यामुळे कर्जमाफीच्या कुबडयांकडे सर्वांचे लक्ष लागते.
5) कर्जमाफीचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे महागाई. सरकारवरचा अतिरिक्त भार कमी करायचा असेल तर इतर वस्तू महाग होतात. अस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांची कर्जे थकलेली असतात. पुन्हा कर्ज घ्यायचे असेल तर बँका काहीतरी त्रुटी काढून कर्ज देण्याचे टाळतात.
कर्जमाफी आणि राजकीय फायदे
कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी शेतकरी सुकाणू समितीसह काँग़्रेस व राष्ट्रवादी पुढे सरसावले आहेत. विरोधकांसह शेतकरी नेत्यांची आता राजकीय महत्त्वाकांक्षा जागी होत आहे. राज्य सरकारने 'सरसकट' कर्जमाफी केल्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरसकट, तत्त्वत: आणि निकष या तीन गोष्टींवर आक्षेप घेत राजकीय चाल खेळली आहे. 'सरसकट' म्हणजे त्यांना आपल्या भ्रष्टवादी पक्षातील नेत्यांची कर्जमाफी व्हावी, अशी अपेक्षा तर व्यक्त केली नाही ना? पवारांनी या कर्जमाफीचा जास्तीत जास्त राजकीय फायदा कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. आपल्या संघर्ष यात्रेमुळे ही कर्जमाफी मिळाली असल्याचा आव आणून काँग्रेस व राष्ट्रवादी पध्दतशीरपणे राजकीय फायदा उचलत आहे. आ. बच्चू कडू आसूड यात्रेतून कर्जमाफी मिळाली असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे कडू हे आगामी काळात राजकीय दवाबगट निर्माण करतील.
मुळात शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दवाब टाकला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण, त्यातील विसंगती व वास्तव याचे चित्र डोळयापुढे उभे ठेवले, तर विरोधकांनी निव्वळ राजकारण कसे केले हे लक्षात येते. स्वाभिमानी राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही रस्त्यावर उतरले. जे सरकार साठ वर्षे होते, त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वातानुकूलित गाडीत बसून संघर्ष यात्रा उभारली. सत्तेतल्या शिवसेनेनेसुध्दा कर्जमाफीचा राग मनात धरून भाजपाविरुध्द षड्डू ठोकले. मात्र त्यामागे शेतकरीहितापेक्षा राजकारणच प्रबळ असल्याचे दिसून आले. खरे म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा भावनिक न बनविता वास्तव निकषावर त्याचा विचार केला पाहिजे होता. पण मंत्रिगटाच्या उच्चाधिकार समितीतील सदस्य व सेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी बैठकीवरून आपल्या 'नाटयछटा' दाखवून दिल्या.
शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या सदस्यांत सुंदोपसुंदी सुरू आहे. डॉ. गिरीधर पाटील हे समितीच्या कारभारावर व निर्णयावर नाराज आहेत. त्यामुळे सुकाणूतील सदस्य हे राजकीय फायद्यासाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संपात विरोधकांनी सूडबुध्दीचे राजकारण केले. सरकारला उघड विरोध करणारे राजू शेट्टी व शिवसेना नेहमीच सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देत असतात. आता कर्जमाफी मिळाली आहे, त्यामुळे हे आगामी काळात काय रणनीती आखतात, हे पाहणे आवश्यक आहे.
कर्जमाफी होईपर्यंत दहा हजाराची मदत
सध्या राज्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. खरीप पेरणीची राज्यात लगबग सुरू आहे. गेल्या वर्षी अस्मानी संकटामुळे खरीप वाया गेले होते. यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला गेला असला, तरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांना दिलासा देण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. सर्व मंत्र्यांनी यास सहमती दर्शविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाने शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करता येणार आहे.
बळीराजाला चार टक्के दराने पीक कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी बळीराजाच्या पाठीशी असल्याची आणखी एक कबुली म्हणजे आता शेतकऱ्यांना केवळ चार टक्के दराने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.
अल्पभूधारकांना शेतमालाच्या साठवणीसाठीही स्वस्त दराने कर्ज देण्याची योजनाही मंत्रीमंडळाने मंजूर केली. या योजनेनुसार हंगामानंतर तयार होणारा शेतमाल 'गोदाम विकास व नियमन प्राधिकरणा'ने प्रमाणित केलेल्या गोदामात सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवण्यासाठी अशा शेतकऱ्यांना बँकांकडून 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. या नऊ टक्क्यांपैकी पाच टक्के व्याज सरकार भरणार आहे.
शेतकऱ्याच्या कृषिकर्जाचे, नैसर्गिक आपत्तीमुळे मुदतीत परफेड होऊ न शकल्याने, पुनर्गठन करावे लागल्यास अशा पुनर्गठित कर्जाच्या रकमेवरील व्याजातही पहिल्या वर्षात केंद्र सरकार दोन टक्क्यांचे अनुदान देण्यात येणार आहे. अल्प - व अत्यल्पभूधारकांना शेतमाल तयार झाल्यावर त्याला चांगला भाव येईपर्यंत वाट पाहण्याची ऐपत नसते, कारण त्यांना लगेच पैशाची गरज असते. परिणामी ते आपला शेतमाल तयार झाला की बाजारभाव पडेल असला तरी विकतात किंवा पैशाची तातडीची निकड भागविण्यासाठी खासगी सावकारांकडून भरमसाठ व्याजदराने कर्ज घेतात. अशा अडचणीत सापडणाऱ्या अल्प- व अत्यल्पभूधारकांना शेतमालाच्या साठवणीसाठीही स्वस्त दराने कर्ज देण्याची योजनाही मंत्रीमंडळाने मंजूर केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सारांश
कर्जमाफी हा शेतीसमस्येवरील अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनीच बदल घडवून आणला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पुत्र चौधरी चरणसिंह असोत, देवीलाल असोत वा शरद पवार असोत अथवा शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे महेंद्र सिंह टिकैत असोत की शरद जोशी आदींना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करणे कधी जमले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली, तरी संपूर्ण समस्या सुटणार नाही. मात्र सामान्य शेतकऱ्यांला दिलासा मिळाला आहे. श्रमप्रतिष्ठेला आलेली अवकळा दूर होऊन शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण कृषिनिष्ठ संस्कृती जोपासली तरच जग जगणार आहे.
मोदी सरकारच्या धोरणावर स्वामिनाथन समाधानी
'हरित क्रांतीचे जनक' अशी ख्याती असलेले कृषितज्ज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर कर्जमाफी देणे तात्पुरते गरजेचे असल्याचे सांगून दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा खूप चांगला पर्याय नाही, कर्जमाफी केल्यास सरकारकडून बँकांनाही नुकसानभरपाई मिळते, असेही मत डॉ. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय कृषी आयोगाने सुचविलेल्या अनेक शिफारशी मोदी सरकारने राबविल्या आहेत, असे स्वामीनाथन यांनी ट्वीट केले आहे. सुधारित बियाणे, मृदा परीक्षण पत्रिका, सुधारित विमा या शिफारशी राबविण्यात आल्याचे स्वामिनाथन म्हणतात.
कृषी विद्यापीठांद्वारे ग्रामीण महिलांच्या कौशल्यवृध्दीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबतही स्वामिनाथन यांनी समाधान व्यक्त केले आहे. कृषी कर्जमाफी आणि भविष्यातली कृषिक्षेत्रातल्या पायाभूत सुविधा सुधारण्याबाबतही संतुलन साधल्याबाबत स्वामिनाथन खूश झाले आहेत.
विकास पांढरे,
9970452767
मंगळवार, ३० मे, २०१७
अहिल्यादेवी होळकर : मराठेशाहीतील सोनेरी पान
मराठेशाहीतील कर्तबगार स्त्रियांची पाने अंधुकच राहिलेले दिसून येतात. या शाहीने राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, झाशीची राणी या कर्तबगार महिलांबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इतिहास अद्यापही अज्ञात आहे. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास वाचकांसमोर आणण्याचे कार्य आमचे पत्रकार मित्र उज्ज्वलकुमार माने यांनी 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाद्वारे केले आहे.
माने हे हाडाचे पत्रकार, उपसंपादक. लोकशाहीच्या चौथा स्तंभात ते प्रदीर्घ अशी सेवा करीत आहेत. 'पोलिस आणि पत्रकारिता', पोलिस आणि जनता' आणि पोलिस हेल्पलाईन 'अशी माने यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाची तिसरी आवरुती प्रकाशित झाली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण अहिल्यादेवीच्या समग्र जीवनाचा परामर्श घेणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता. माने यांनी अनेक संदर्भ साहित्याचा सखोल अभ्यास करून सामान्य वाचकांला पचनी पडेल या हेतूने ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहिल्यादेवीचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
हा कालपट सांगण्याबरोबर माने यांनी मराठेशाहीतील पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनाचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. मल्हाररावांचा बुंदेलखंडावर कब्जा,रोहिले,जाट,मराठे आणि शीख कसे एकत्र आले होते हे प्रकरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पती खंडेराव होळकर युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणाऱ्या अहिल्येस सासऱ्याने थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अहिल्यादेवीने अखंड २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्नबांधणी,जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोककल्याणकारी कामामुळे भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
अहिल्यादेवी आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अशा भ्रष्ट मंदिरांची पुनु निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली.
अहिल्यादेवीने अनेक लोकोपयोगी कामे करून जनतेचे मने जिंकली. नर्मदा नदीच्या तीरावर महेश्वर येथे राजधानी हालविली. भारतात सुमारे २५ ठिकाणी अहिल्यादेवींनी शिवालयाची निर्मिती केली. पंढरपुरात होळकर वाडा बांधला. अनेक ठिकाणी दगडी विहीर बांधल्या. पशू -पक्ष्यांसाठी पिके विकत घेतली. पर्यावरणाच्या बाबतही अहिल्यादेवींचा दूरदूष्टीपणा होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान २० झाडे लावली पाहिजेत असा त्यांचा हुकूम होता. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद होती. अहिल्यादेवी इंग्रजाची चाल ओळखून होत्या. त्यासाठी महादजी शिंदे यांना पुणे दरबारी जाऊन इंग्रजाविरूध्द योजना करण्यासाठी आग्रह धरला होता. अहिल्यादेवी या सर्वगुण संपन्न होत्या. त्यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर हे सुंदर हस्ताक्षराचा नमुना होय.खरेदी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र समजला जाणारा सातबारा उतारा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातच निर्माण झाला. त्यांनी शत्रूंशी लढा देण्यासाठी महिलांची विशेष फौज तैनात केली होती. अनेक लढाया त्यांनी केल्या व जिंकल्याही.
लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथात अहिल्यादेवीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भातील काही निवडक पत्राचा माने यांनी ग्रंथात समावेश केला आहे. होळकर घराण्यातील नातीगोती व संपर्कात आलेल्या प्रमुख व्यक्तींचे नावे दिली आहेत. त्याचबरोबर कारभारी, होळकर राजघराण्याची वंशावळ होळकर घराण्याशी संबंधित छायचित्रे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना अधिक पसंतीस उतरले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्शवत कार्य लक्षात घेऊन माने यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
परीक्षण - विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७
ग्रंथ :रणरागिणी अहिल्यादेवी
लेखक : उज्ज्वलकुमार माने -९९२२४२४६१९
प्रकाशन
यशोदिप पब्लिकेशन्स
२१७ ब,जोरी निवास,नारायण पेठ, पुणे -४११०३०, ९८५०८८४१७५
पाने :११२, मूल्य : ११०/-
माने हे हाडाचे पत्रकार, उपसंपादक. लोकशाहीच्या चौथा स्तंभात ते प्रदीर्घ अशी सेवा करीत आहेत. 'पोलिस आणि पत्रकारिता', पोलिस आणि जनता' आणि पोलिस हेल्पलाईन 'अशी माने यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथाची तिसरी आवरुती प्रकाशित झाली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण अहिल्यादेवीच्या समग्र जीवनाचा परामर्श घेणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता. माने यांनी अनेक संदर्भ साहित्याचा सखोल अभ्यास करून सामान्य वाचकांला पचनी पडेल या हेतूने ग्रंथाची निर्मिती केली आहे. अहिल्यादेवीचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
हा कालपट सांगण्याबरोबर माने यांनी मराठेशाहीतील पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनाचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. मल्हाररावांचा बुंदेलखंडावर कब्जा,रोहिले,जाट,मराठे आणि शीख कसे एकत्र आले होते हे प्रकरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पती खंडेराव होळकर युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणाऱ्या अहिल्येस सासऱ्याने थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अहिल्यादेवीने अखंड २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्नबांधणी,जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोककल्याणकारी कामामुळे भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
अहिल्यादेवी आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्मकारणात सर्वस्व दानी होत्या.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अशा भ्रष्ट मंदिरांची पुनु निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली.
अहिल्यादेवीने अनेक लोकोपयोगी कामे करून जनतेचे मने जिंकली. नर्मदा नदीच्या तीरावर महेश्वर येथे राजधानी हालविली. भारतात सुमारे २५ ठिकाणी अहिल्यादेवींनी शिवालयाची निर्मिती केली. पंढरपुरात होळकर वाडा बांधला. अनेक ठिकाणी दगडी विहीर बांधल्या. पशू -पक्ष्यांसाठी पिके विकत घेतली. पर्यावरणाच्या बाबतही अहिल्यादेवींचा दूरदूष्टीपणा होता. प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान २० झाडे लावली पाहिजेत असा त्यांचा हुकूम होता. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद होती. अहिल्यादेवी इंग्रजाची चाल ओळखून होत्या. त्यासाठी महादजी शिंदे यांना पुणे दरबारी जाऊन इंग्रजाविरूध्द योजना करण्यासाठी आग्रह धरला होता. अहिल्यादेवी या सर्वगुण संपन्न होत्या. त्यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर हे सुंदर हस्ताक्षराचा नमुना होय.खरेदी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र समजला जाणारा सातबारा उतारा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातच निर्माण झाला. त्यांनी शत्रूंशी लढा देण्यासाठी महिलांची विशेष फौज तैनात केली होती. अनेक लढाया त्यांनी केल्या व जिंकल्याही.
लेखक उज्ज्वलकुमार माने यांनी आपल्या 'रणरागिनी अहिल्यादेवी' या ग्रंथात अहिल्यादेवीच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भातील काही निवडक पत्राचा माने यांनी ग्रंथात समावेश केला आहे. होळकर घराण्यातील नातीगोती व संपर्कात आलेल्या प्रमुख व्यक्तींचे नावे दिली आहेत. त्याचबरोबर कारभारी, होळकर राजघराण्याची वंशावळ होळकर घराण्याशी संबंधित छायचित्रे दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना अधिक पसंतीस उतरले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्शवत कार्य लक्षात घेऊन माने यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे.
परीक्षण - विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७
ग्रंथ :रणरागिणी अहिल्यादेवी
लेखक : उज्ज्वलकुमार माने -९९२२४२४६१९
प्रकाशन
यशोदिप पब्लिकेशन्स
२१७ ब,जोरी निवास,नारायण पेठ, पुणे -४११०३०, ९८५०८८४१७५
पाने :११२, मूल्य : ११०/-
शनिवार, २७ मे, २०१७
सावरकरांचे नाट्यविश्व : एक आकलन
![]() |
| नाटककार वि.दा.सावरकर |
मराठी रंगभूमिच्या इतिहासात कृ.पा. खाडिलकर,राम गणेश गडकरी,मामा वरेरकर आदी नाटककरांनी मराठी ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली असली तरी ऐतिहासिक सत्यता,सभोवतालची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, बदलले राजकीय संदर्भ आणि अस्थिरतेचे विषय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाटकात दिसून येतात शिवाय सावरकरांनी मराठी नाटकाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे रंगमंच,बोलपट,वेशभूषा,नेपथ्य,सं वाद असे अनेक शब्द दिल्यामुळे सावरकरांचे मराठी रंगभूमीवरील स्थान अढळ आहे हे कोणीही नाकारु शकत नाही.
१९२०-३० हा काळ हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय राजकारणात उलथापालथीचा काळ समजला जातो.टिळक युग संपवून गांधी युगाला सुरुवात झाली होती. याच काळात काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या राजकारणाला,सशस्त्र क्रांतीला,तत्वज्ञानाला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. शिवाय अखिल भारतीय मराठी नाट्य इतिहासाचा पायाही खचू लागला होता. हा काळ इंग्रजी राजवटीला विरोध करणारा असल्याने स्वातंत्र्यवीरांच्या झुंजार लेखणीतून राजकीय आणि सामाजिक बांधलिकी जपणारे नाट्यकृतीचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. सावरकरांचे काव्य,कादंबरी, संशोधन, चरित्र लेखन, हे जसं वाड;मयाच्या दुष्टीने अभ्यास करणं गरजेचे आहे. तसंच त्यांच्या नाट्यकृतीचा चिकित्सक,आस्वादक भूमिकेतून संशोधन लेखन झाले पाहिजे. सावरकर मुळातच हे व्यामिश्र व्यक्तिमत्व आहे. त्याची विज्ञाननिष्ठा,हिंदू समाजात परिवर्तन घडवून आणण्याची तळमळ त्यांच्या तीनही नाटकात दिसून येते.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी एकूण चार नाटके लिहिली त्यापैकी 'बोधीसत्व' हे चौथे नाटक अपूर्ण आहे. रत्नागिरीत स्थानबध्द असताना सावरकरांनी १९२७ साली 'उ:शाप' हे पहिले नाटक लिहिले. मराठी रंगभूमिच्या ऐन बहराच्या काळातले हे महत्त्वाचं नाटक समजलं जातं.
१९२७ साली महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. गांधीवादाचा अतिरेक वाढला होता. त्यामुळं सावरकरांनी या घटनांना समोर ठेवून आपल्या 'उ:शाप'नाटकात याचा समाचार घेतला आहे. त्यासाठी मायापूर नावाच्या काल्पनिक नगरीचे कथानक वापरले आहे. शंकर व कमलिनी या दलित प्रियकर प्रेयसीची कथा मध्यवर्ती ठेवून त्याच्या जोडीला किसन हा शंकरचा मित्र आणि कमलिनीचा भाऊ. या तिघांवर व संंत चोखामळ्यावर होणाऱ्या जातीय अन्यायाचं चित्रण नाटकातून येते. सावरकरांनी नाटकाचा आशय आणि त्यातील प्रसंग संत चोखामेळा यांच्या कालखंडातील निवडलेले आहोत.
या नाटकातील चोखामेळा यांच्या तोंडून निघालेला प्रसंग खूप विचार करायला लावणारा आहे तो म्हणतो,"सर्व शास्त्राचा कर्ता आणि करवता जो परमेश्वर त्यालाच मी प्रत्यक्ष हा प्रश्न विचारणार आहे. माझ्या एकट्यासह नव्हे तर कोटी कोटी अस्पृश्य जातीच्या जीवनाचे ध्येय कोणते ? आम्हास देव आहे की नाही ?या जन्मी तरी उध्दार व्हावा म्हणून काय नियम पाळले पाहिजेत आणि कशी भक्ती केली पाहिजे? याचा उलगडा पांडुरंगाच्या तोंडुन करवून घेणार ,"
या प्रसंगातून सावरकरांचा अस्पृश्यतेविषयी विचार लक्षात येतो. माणसाला माणूस म्हणून जगावेसे वाटत असताना सामाजिक व्यवस्थेने दिलेला उ:शाप किती भयानक स्वरूपाचा आहे हे सावरकर समजावून सांगतात. गांधीवादाला विरोध करण्यासाठी या नाटकात सावरकरांनी सत्यवान हे पात्र वापरले आहे. सत्यवान आणि शिष्य यांच्या संवादातून गांधीवादावर कशा प्रकारे कडाडून हल्ला चढविला आहे हे पाहणं अगत्याचे वाटते.
तिसरा शिष्य : 'तर मग पंचतंत्र,हितोपदेश हे नीतिग्रंथ त्याज्यच होत."
सत्यवान :"सर्वस्वी अहो ते नीतिग्रंथ कसले ?ते अनितिग्रंथ आहेत. काय म्हणे घोडा म्हणाला,उंट हसला,उंदीर उद्गगारला !धिक्कार,धिक्कार त्या असत्यवाद्यांना त्यांचं नांव काढलं की,अंगाची लाही लाही होते."
दुसरा शिष्य : "ही लाहीची पण उपमाच झाली."
सत्यवान :"क्षमा करा बरोबर धरलंत !अंगाचा संताप होते.माझ्या आश्रमात एक वेळ मद्य प्यायलं तरी चालतं,कारण ते सत्य आहे. पण काव्य वाचणं खपत नाही. काय बाई तुम्ही का आलात ?
बाई : "माझ्या मुलाचं डोकं अतिशय दुखतं आहे."
सत्यवान : "बाई चार दिवस तुम्ही निर्भेळ सत्य बोला, तुमच्या मुलाचं डोकं हटकून राहिल,काय? अविश्वास वाटतो ?अहो तुम्ही सत्य बोललात म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहील. मनात प्रसन्न ता आली की तुमच्या आसपास सत्व आणि प्रसन्नता फैलावून मुलाचं डोकं दुखणं,म्हणजे अप्रसन्नता दूर होईल. सत्यानं सर्व रोग दूर होतात.
तिसरा : "सत्यागारात आणि एकांत ?तुम्हाला सत्यधर्म म्हणजे काय ? हे मुळीच कळलं नाही. एकांत म्हणजे इतरांपासून काही लपवून ठेवण्याची इच्छा लपविणे म्हणजे असत्य. म्हणून सत्यधर्माच्या अनुयायांस एकांतात काहीही गोष्ट बोलण्याची, करण्याची सक्त बंदी असते. आम्ही आमच्या शिष्य, शिष्यिणीस नियम घालून दिलेला आहे की,जर तुम्हास सत्यसक्ती संतती हवी असेल तर. प्रजनन हे देखील एखाद्या पापकृतीत्यासारखं अंध:काराचे पडदे सोडून करू नका,तर स्वच्छ स्पष्ट आणि सत्य प्रकाशाच्या सूर्यकिरणात तुमचे ग्रहस्थ धर्म आचारित जा म्हणजे संतती गर्भापासूनच सत्यवक्ती आणि निरोगी होईल.
उपहास आणि उपरोधाने भरलेल्या या प्रसंगात सावरकरांनी गांधीवादी विचारधारेवर फटकारे ओढले आहेत. अहिंसेचा मार्ग कितपत अयोग्य आहे हे स्पष्ट करताना अहिंसेचा अतिरेकपणा राष्ट्रीय शिष्टाचाराला धोका कशाप्रकारे होतो हे स्पष्ट केले आहे.
'संन्यस्त खडग'(१९३१) या नाटकात सावरकरांनी अहिंसा तत्वावर प्रहार केला आहे. गौतम बुध्दांच्या विचार काळाशी निगडीत असलेले नाटक.गौतम बुध्दाच्या सांगण्यावरून 'शाक्य'सेनापती विक्रमसिंह शस्त्र त्याग करून संन्यासी होतो.बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्र त्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या असुरक्षितेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा शेजारील विक्रमसिंहचा पूत्र वल्लभाच्या सेनापतीतत्वाखाली असलेले राज्य शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेष धारण करून रणांगणात उतरते.पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूत पूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी अहिंसा व नैतिकता यावर वाद विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (संन्यस्त खडग) उपसून शाक्यांना विजयी करतो.असं या नाटकाचं मूळ कथानक आहे.
सावरकरांनी या नाट्यातील अहिंसात्मक विचारांवरील वाद -विवादाने हे नाटक वाड्:मयीनदुष्ट्या अतिशय सुंदर आहे.
या नाटकाला लाभलेले दुसरे परिणाम म्हणजे स्वगत होय. युध्दात पराभव होऊन शत्रूचा बंदा होतो तेव्हा त्यांच्या पत्नीला भावना सावरकरांसारख्या महाकवीने स्वगताला कलात्मकता प्राप्त करुन दिली आहे.
१९६१ साली अहमदशहा अब्दालीकडून मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत महानीकारक पराभव नव्हेच तर या लढाईमुळं मराठी सत्ता खिळखिळी झाली. नंतर थोरले माधवराव पेशवे,महादजी शिंदे या मराठ्यांनी दिल्लीवर चाल करून पराभवाचे उट्टे भरून काढले. हिंदुस्थानात हिंदू धर्माची सत्ता स्थापन करण्याची इच्छा सदाशिव भाऊची होती. ही इच्छा पूर्ण करण्याची शपथ माधवराव घेतात. एका अर्थाने भाऊची इच्छा 'उत्तरक्रिया'करून करतात असे कथानक असलेले सावरकरांचे 'उत्तरक्रिया' (१९३३) हे शेवटचे नाटक होय.
पानिपतच्या रणांगणावर वीरमरण झालेल्या मराठ्यांचे कार्य पूर्ण करणे म्हणजे 'उत्तरक्रिया'अशा स्वरूपाचे वक्तव्य एका वेडीच्या मुखातून सावरकर वदवून घेतात. वेडी आणि माधवराव पेशवे यांच्यातील संवादातून गूढ उलगडलं आहे.
वेडी :"कोणाची उत्तरक्रिया म्हणून सांगू तुला ?अरे शनिवारवाड्याचा जो धनि आहे. तोच भट बोलाव आणि आमची उत्तरक्रिया कर ! तरच आमच्या अंतरळात तळमळणाऱ्या अतूप्त जीवांना उत्तम गति मिळेल.असे पानपतीं पडलेले सहस्त्रावधि अतूप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात.ते बघ माझे पतिराज,तो बघ माझा तरूण तनय !झुंजत पडले बघ रणांत !ती बघ माझी मुलगी ,अगं बाई गं,घायाळ केली,रक्तबंबाळ केलीना रे त्या राक्षसांनी !त्या माझ्या पतीची,मुलाची, मुलीची (पहारेकऱ्याकडे बोट दाखवून ) तुझ्या बापाची,तुझ्या भावाची (माधवरावांकडे बोट दाखवून ),नि तुझ्या काकांची!"
माधवराव : ( दचकून ) "काय ? आमच्या काकांची ? भाऊसाहेबांची ? उत्तरक्रिया ?"
वेडी : "होय ! त्याच तुझ्या चुलत्याची नि तुझ्या बापाची नि तुझ्या भावाची -विश्वासरावाची ! इतक्यातच दचकतोस काय असा ? आणखी ऐक अगं बाई ? पण माझ्या पायात बोचलं काय पुन्हा ? काचा ! काचा ? ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग ! घरोघरी बांगडी फुटली.ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे हे माझं ह्दय !भरा !मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे !त्या लाखांची नाव ऐक नावं,पानिपत ! मला पानिपतची उत्तरक्रिया करायची आहे ! आणि त्या पानिपतच्या उत्तरक्रियेचा भट तू !"
सावरकरांच्या प्रतिभाशाली विचारातून साकार झालेल्या या नाटकात पराक्रमी मराठ्यांचा इतिहास उभा करून देशवासियांना ज्वलंत स्वाभिमान बाळगण्याचा सल्ला देऊन जातात. या नाटकाच्या शेवटी यशवंतराव ब्रिटिशांशी वाटाघाटी करताना माधवरावांना उपयोगी पडतो असे दाखविले आहे.
सावरकरांच्या नाटकांविषयी समीक्षक मकरंद साठे म्हणतात की, "सावरकरांच्या तीनही नाटकात ऐतिहासिक पात्रं आहेत. चोखामेळा,गौतम बुध्द, माधवराव पेशवे. आधीच्या ऐतिहासिक नाटकांविषयी खूपच वेगळी ती गौरवशाली इतिहासाची साक्ष देण्यापुरती नाहीच तर पुढच्या टप्प्यावर भाष्य करतात.
तर भालचंद्र खांडेकर सावरकरांच्या नाटकाविषयी मूल्यमापन करताना म्हणतात,"स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभा एका झपाटलेल्या क्रांतीकारकाची होती. त्यांच्या प्रतिभेला सामान्य विषयांचा लोभ नव्हता. सामाजिक सुधारणा आणि प्रखर राष्ट्र निष्ठा हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक होते.
- ९९७०४५२७६७
( पूर्वप्रसिद्धी साहित्य चपराक मासिक फेब्रुवारी -मार्च २०१५ )
बुधवार, २४ मे, २०१७
मी पाहिलेला साहेबराव...
२००२ ते २००३ वर्ष असावं,तेव्हा मी सोलापूर व देवगिरी तरुण भारत मध्ये स्फूट लिखाण करत असे. त्याकाळी माझा शालेय टप्पा पूर्ण झाला नसेल, त्यामुळे लिखाणात धार नव्हती. तसं आजूबाजूचे वातावरण पोषक नव्हतं. न कळत्या वयात काहीतरी लिहायची सवय लागली होती. या सवयीला प्रेरणा दिली ती साहेबराव घुगे या मित्रानी.
अणदूर हे तसं काँग्रेस विचासरणीचं गाव.या गावाने दोन आमदार दिले आहेत . अशा वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधलिकी म्हणून काम करणाऱ्या धडपड्या युवकांशी माझा संपर्क आला. त्यामध्ये साहेबरावांचा अग्रक्रम लागतो. साहेबरावाचे वडील हाडाचे शिक्षक. घरात संघ वातावरण. त्यामुळे ते घडत गेले. त्याकाळी साहेबराव सा.'विवेक' साठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे काम पाहत होते. ते आजही तेच काम पाहतात. प्रचंड जनसंपर्क आणि माणसं पारखण्याची कला या माणसाकडे आहे. या गुणाचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव राहिला.
मी अकरावीत शिकत असतानाच तरुण भारत साठी पूर्णवेळ वार्ताहर म्हणून काम पाहू लागलो. या भागातील महत्त्वाचे विषय, बातम्या व लेख दैनिकासाठी पाठवत असे. त्याकाळी आमच्याकडे ईमेलचा जन्म ही झाला नव्हता. कोऱ्या - करकरीत पानावर समास ठेवून बातम्या फँक्स करून पाठवावं लागायचं. आता स्वहस्ते लिहिण्याची सवय मोडली आहे. मोबाईल मुळे लिहायला आणि बातम्या पाठवायला सोपे झाले आहे.
त्याकाळी मला कोणतेही मानधन मिळत नव्हते. त्यामुळं माझी तारांबळ व्हायची. सगळ्या बातम्या फॅक्स करून पाठवणं हे माझ्या ऐपतीत नव्हते. पोस्टाने पाठविलेल्या बातम्या उशिरा लागायच्या. एकदा साहेबरावनी माझी ही धडपड पाहिली. त्या धडपड्याला आकार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तब्बल तीन ते चार वर्षे आम्ही एकमेकांच्या सहवासात राहिलो. एकमेकांच्या विचारातून एकमेकांना घडवणारा असा हा माणूस मला भेटला. संकटात दिलासा देणारा,समजून घेणारा, निस्वार्थी भावनेने आपुलकीचे दोन शब्द प्रेमाने बोलणारा साहेबराव मला खूप भावला.
अणदूर व परिसरातील असह्याला मदत करणारा, बुडत्याला हात देणारा, वृद्धांना आधार देणारा, सतकर्म करून फक्त आशीर्वाद घेणारा साहेबराव ही मी पहिला. माणसांना श्रीमंतीत न तोलणारा, माणसातील माणूसकी जागा ठेवणारा, माणुसकीच्या धाग्यात माणसांना गोवाणारा, हातात हात देणारा हीच साहेबरावची जीवन जगण्याची खुबी.
सा.विवेकसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल साहेबरावचा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, सरसंघचालक सुदर्शनजी आदीच्या हस्ते गौरव करण्यात आला. अणदूर व परिसरातील युवक व विद्यार्थ्यांमध्ये वैचारिकता वाढावी यासाठी केशव वाचनालयाची केलेली निर्मिती, त्यासाठी साहेबरावला करावा लागलेला संघर्ष हे मी जवळून अनुभवला आहे. आज ते पक्षीय संघटनात्मक बांधणीत अग्रेसर असतात.२०१२ साली पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अणदूर सारखा काँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांचा विरोधक माजी आमदारच्या घरातील असल्याने साहेबराव विजयी होईल अशी कुणाला खात्री नव्हती. प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्याला जनता भरभरून मत देते हे साहेबरावच्या विजयानंतर लक्षात आले.
तुळजापूर पंचायत समितीमध्ये त्यांनी केलेले काम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. साहेबरावच्या सहवासामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन झाले. त्याचबरोबर पदवीधर आमदार श्रीकांत जोशी यांची 'तरुण भारत' साठी पान एकसाठी मुलाखत घेता आली.
अन् मी 'विवेक' शी जोडलो
माझ्या वाचनात जी जी मराठी मासिके आणि साप्ताहिके वाचनात आलीे, त्यामध्ये सा.विवेकचे स्थान मोठे आहे. नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथीेल बालाघाट कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे 'विवेक'चा 'तुमचा नातू हिंदू राहील का' विशेषांक वाचण्यात आला. त्या अंकामुळे 'विवेक' नियमित वाचू लागलो. या विशेषांकाची धाराशिव जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त नोंदणी त्यांनी केली होती. प्रत्येक गावात, शाळा-महाविद्यालयात आणि वाचनालयात हा अंक पोहोचण्यात साहेबरावचा मोठा वाटा आहे. 'विवेक' वाढावा यासाठी साहेबरावनी घेतलेली मेहनत मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे.
साहेबरावबद्दल एक किस्सा सांगितला जातो - मे २००५मध्ये साहेबरावांचे लग्न झाले. याच काळात 'विवेक'च्या वतीने पू.सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. साहेबराव हा ग्रंथ तामलवाडी ( ता.तुळजापूर) येथील एका कंपनीत द्यायचा होता. साहेबरावच्या अंगावरची हळदही निघाली नव्हती, येणाऱ्या
परिणामांची पर्वा न करता तो अणदूरहून तामलवाडीला निघाला. तामलवाडीत आल्यानंतर त्यानी एक भाड्याने सायकल घेऊन कंपनीच्या दिशेने निघाला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य आग ओकत होता, शरीर घामाघूम झालं होतं. कसल्याही परिस्थितीत हा ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्याचा हेतू होता.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एँड. मिलिंद पाटील हे आपल्या कारने सोलापूरकडे जात होते, ऍड. मिलिंद पाटलांची नजर साहेबरावकडे गेली. त्यांनी लागलीच आपली गाडी थांबवली. ते साहेबरावांना म्हणाले, ''एवढ्या उन्हात सायकलीवरून कुठे निघालात?" साहेबरावनी सर्व हकीकत सांगितली.
त्याच दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांना ग्रंथ देण्यासाठी साहेबराव धाराशिवला पोहोचला.
"अरे,साहेबराव! तुझं लग्न होऊन आठ दिवसही झाले नाहीत, अंगावरची हळदही निघाली नसताना तू उन्हातान्हात कुठे निघालास? गुरुजींचा ग्रंथ नंतरही पाठवला असता'' साहेबराव,तू घेत असलेल्या मेहनतीबद्दल मला अभिमान वाटत असल्याचे उद्गगार संघाचे ज्येष्ठ प्रचारक राजाभाऊ बटू यांनी काढले.
साहेबरावचा हा किस्सा अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळतो. काळाच्या ओघात आज अनेक वैचारिक मासिके आणि साप्ताहिके बंद पडत आहेत. पण आज सत्तरीतही सा.विवेक तग धरून आहे. दिवसेंदिवस 'विवेक' कलाकलाने वाढतोय तो अशा निःस्पृहपणे काम करणाऱ्या व्यक्तीमुळे. विवेक वाढण्यासाठी असे अनेक निःस्पृह हात मदत करत आहेत. अशा व्यक्तींच्या सहवासात मला राहता आल्याने मी आज 'विवेक' चा उपसंपादक होऊ शकलो.
कुठेही मोठेपणा न मिरवणारा हा साधा माणूस मला सदैव मोठ्या भावासारखा पाठीराखा राहिला. मी देवाला प्रार्थना करतो की, साहेबराव सारखा माणूस सदैव माझ्या डोळ्यासमोर असू दे. हे देवा माझ्या या भावाला उदंड आयुष्य लाभो दे.
©विकास पांढरे, ( उपसंपादक, सा.विवेक)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
कुशल व्यवस्थापक
असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...
-
'रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकऱ...
-
गेल्या तीन चार वर्षापासून जन्मतारीख जवळ आली की, मनात सल निर्माण होत असते. ती कुणापुढे उघड करता आली नाही. कारण माझा स्वभावही तसा न...
-
साहेबराव :- हॅलो, हॅलो!! मायबाप सरकार, मी साहेबराब करपे, हं त्योच महाराष्ट्रातला पहिला आत्महत्याग्रस्त शेतकरी बोलतोय... सरकार : ......


























