मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

नक्षलवाद समजून घेताना


छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले. तर आणखी काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. मन विषण्ण झाले. आपल्या देशातील गद्दार देशद्रोह करून सामाजिक विषमता कुलुषित करत करत आहेत. आपल्या देशाला नक्षलवाद्याचे हे आव्हान नवीन नाही. यापूर्वी भारतीय जवानांवर झाले आहेत. नक्षलवाद म्हणजे काय? स्वरूप, व्याप्ती आणि एकूणच भारत देशावर झालेला परिणाम समजून घेण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे नक्षलवादाचे आव्हान चीनचे भारताशी छुपे युद्ध हा ग्रंथ उपयुक्त ठरला. मुळात लेखक लष्करात राहून भारत चीन सीमा, भारत पाकिस्तान सीमा, काश्मीर, ईशान्य भारत, राजस्थान अशा वेगवेगळ्या भागात ३६ वर्षे सेवा केली आहे. या प्रदीर्घ अनुभवाची अनमोल शिदोरी म्हणजे हे पुस्तक होय.

पुस्तकाचे अतरंग 

३२४ पानाच्या या पुस्तकात भारताची अंतर्गत, बाह्य सुरक्षा आणि इतर आव्हाने, माओवाद्यांचा भारतात प्रसार आणि सध्याची परिस्थिती:नक्षलवाद आणि आपली व्यवस्था, माओवादाचा पूर्वइतिहास,देशात पसरण्याची कारणे आणि सरकारचा प्रतिसाद, माओवाद्यांचे अड्डे वने आणि आदिवासी-सरकारला काय हवे ? अहिंसात्मक सत्याग्रह की माओवाद ?, माओवाद्यांचे अत्याचार आणि भयभीत रक्तबंबाळ आदिवासी, माओवाद्याचे रक्तरंजीत थैमान आणि सुरक्षा व्यवस्थेच्या चिंधाड्या,माओवाद्यांचे डावपेच,संघटना आणि लढण्याची पध्दती, माओवाद्यांचे अर्थकारण आणि खंडणी राज्ये, आँपरेशन ग्रीन हंट विरुद्ध रेड काँरीडाँट,एक थंडावलेली मोहीम, निवडणुका,लोकशाही आणि बुलेट वि.बँलेटची लढाई, माओवादी भरकटलेले विचारवंत आणि प्रसार माध्यमे, माओवाद्यांचे मानवी हक्क आणि इतर पैलू, माओवाद्यांचा चक्रव्युहात हरवलेले पोलीस आणि अर्धसैनिक बले, सलवा जुडूम,एसपीओज,c-७० कंमोडाज अदिवासी पोलिसांविरूध्द अदिवासी नक्षलवादी, माओवाद्यांची लढाई, वाटाघाटी : काही आशेचे किरण, माओवादी विदेशी सहकार्य आणि चीनचे भारताशी छुपे युद्ध, भारताची बाह (सीमा) ची सुरक्षा : १९६२ च्या घोडचुकांपासून आपण काय काही शिकलो का ? माओवाद्यांश लढाई :सेना शेवटचा उपाय, माओवाद संपविण्यासाठी व्यापक सर्व समावेशक उपाय आणि माओवाद थांबविण्यासाठी वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या अशा महत्त्वाच्या घटकांवर चिंतनशील विचार वाचायला मिळतात.

नक्षलवादाचे स्वरूप 

 नक्षलवाद्याचे उगमस्थान हे पश्चिम बंगाल, १९६७ साली कानु सन्याल आणि चारू मुझुमदार यांच्या ( नक्षलबारी गाव ) नेतृत्वाखाली नक्षलवाद उद्यास आला. १९७२ साली त्याचा बिमोड करण्यात आला. त्यानंतर १९८७ साली नक्षलवादाचा पुन्हा जन्म झाला.२०११ साली देशभर १६००हून अधिक नक्षलवादी हल्ले झाले. पाकिस्तान आणि चीनने तेल ओतण्याचा प्रयत्न केला. सध्या देशातील १६ राज्यात,२३२ जिल्ह्यात,१४ हजार खेड्यामध्ये नक्षलवाद कार्यरत आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड दंडकारण्यामध्ये दहा हजार च्या आसपास नक्षली आहेत. गेल्या पाच वर्षात ९ हजार ८२९ जण नक्षलवाद्यांच्या  गोळ्यांचे शिकार झाले आहेत.

नक्षलवाद्यांची संघटना :

       नक्षलवाद्यांच्या एकूण तीन संघटना आहेत. एक राजकीय,दुसरी सशस्त्र आणि तिसरी दलम. दलम ही नक्षलवादी कारवायांच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाची संघटना. प्रत्येक दलामध्ये दहा ते पंधरा तरुण असतात. त्यात तीन ते चार युवतींचा सहभाग असतो. एके ४७,३०३,३१२,१२ बोअर,हातबाँम्ब,देशी बनावटीच्या रायफल्स अशा शस्त्रांचा वापर केला जातो.

नक्षलवाद्यांचे अर्थकारण :-

आपल्या देशाचे बजेट नेहमी घाट्यात चालते पण माओवाद्यांनी बँकेमध्ये इतर ठिकाणी प्रचंड पैसा गोळा करून ठेवला आहे. खंडणी वसूल करणे, अफुची शेती,वनसंपत्तीचे स्मगलिंग करणे,याशिवाय परदेशातून माओवाद्यांना पैसा मिळतो. माओवाद्यांसाठी लढणाऱ्यांना चार ते पाच हजार रूपये पगार मिळतो.

नक्षलवाद्यांचा दहशतवाद :

महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या सर्व राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे विविध गट काम करत आहेत. जोपर्यंत नक्षलवाद्यांचा बिमोड होत नाही. तोपर्यंत पुढची शंभर वर्षे नक्षलवादी असेच उपद्रव देत राहतील.

नक्षलवाद्यांचे समर्थन म्हणजे रोगापेक्षा इलाज गंभीर :
आज तथाकथित विचारवंत,लेखक नक्षलवाद्यांचे समर्थन करत असतात. आतापर्यंत तीन नक्षलवाद समर्थक नेत्यांना रँमन मँगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाचा घात करण्याचा प्रकार तथाकथित मंडळी करत आहेत.

लष्करी कारवाई करण्याची वेळ :

१९६७-७० मध्ये प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिध्दार्थ शंकर रे यांनी लष्करी दलाच्या सहाय्याने चळवळ मोडून काढली होती. पण त्यांची व्याप्ती लहान होते. आज ही चळवळ फोफावली आहे. तिचा निप्पात करण्याची वेळ आली आहे. जेथे जेथे अशा कारवाया होत आहेत. तेथे तेथे सशस्त्र दलांची संख्या वाढवून तिचा बिमोड करावा लागणार आहे.

सारांश :-
              लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आपल्या ग्रंथातून भारतातील नक्षलवादी चळवळीला चीनचे कसे सहकार्य मिळते यावर मंथन केले आहे. माओवाद संपविण्यासाठी सर्व समावेशक उपाय देखील त्यांनी सांगितले आहेत. एकूणच भारतातील माओवाद-नक्षलवाद समजून घेण्यासाठी हा ग्रंथ सुजाण वाचक,विद्यार्थी, अभ्यासक यांना उपयुक्त आहे.
 ©विकास पांढरे, सोलापूर ९९७०४५२७६७

नक्षलवादाचे आव्हान
चीनचे भारताशी छुपे युद्ध
लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन
०२२६ ८५१७८३,९०९६७०१२५३
प्रकाशन : नचिकेत प्रकाशन,नागपूर-४४००१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...